दिव्यातही 'तू फक्त लढ, आम्ही सोबत आहोत' बॅनरची चर्चा



 

दिवा, (आरती मुळीक परब ) : येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजप पक्षातील पदाधिकारी निवडून आल्यास मतदार संघाचा चांगला विकास होईल, असे म्हणत भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कल्याण जिल्हा सरचिटणीस नंदू परब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी 'तू फक्त लढ, आम्ही सोबत आहोत' असे बॅनर दिव्यातील विविध भागात लावले आहेत. या बॅनरची कल्याण ग्रामीण भागातील डोंबिवलीनंतर आता दिव्यातही जोरदार चर्चा सुरू आहे.



भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) यांची महायुती आहे. आता सत्तेत असलेल्या महायुतीने महाराष्ट्रात बरीच विकासाची कामे केल्याने जनतेचा कौल पुन्हा महायुतीलाच जाऊन त्यांच्याच मुख्यमंत्री होईल, अशी चर्चा सद्या कल्याण ग्रामीणमध्ये रंगलेली आहे. 




कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात भाजपकडून विकासाची कामे झाल्यामुळे हा संघ आपल्याकडेच असावा, अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी नेत्यांकडे केली आहे.कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघांची दिव्यापासून सुरुवात झाल्यामुळे दिव्यातील भाजप मंडळ अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस यांनी कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या नंदू परब यांना वाढदिवसाच्या बॅनर मधून दिलेल्या शुभेच्छा हा चर्चेचा विषय झाला आहे. नंदू परब हे कोकणी असल्यामुळे दिव्यातील चाकरमान्यांचा ही त्यांचा भरगोस पाठिंबा मिळत आहे. तर कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघातील कल्याण, डोंबिवलीत भाजप कल्याण जिल्हा सरचिटणीस नंदू परब यांची उत्तम पकड आहे. त्यांचा दांडगा जनसंपर्क असल्याने नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी ते सतत प्रयत्न करत असतात. या मतदारसंघात भाजपकडून परब यांना उमेदवारी मिळाल्यास मतदारसंघाचा कायापालट होईल आणि विकास होईल असे बोलले जात आहे.





Post a Comment

Previous Post Next Post