महिला सुरक्षितता आणि शिष्यवृत्ती याबाबत कार्यशाळा

 


अलिबाग, ( धनंजय कवठेकर) :  पेझारी येथील कोकण एज्युकेशन सोसायटीचे लक्ष्मी-शालिनी महिला महाविद्यालय पेझारी येथे महाराष्ट्र शासन उच्च शिक्षण विभाग आणि मुंबई विद्यापीठाच्या निर्देशानुसार "महिला सुरक्षितता आणि शिष्यवृत्ती" याबाबत कार्यशाळा घेण्यात आली.याप्रसंगी माजी आमदार पंडित पाटील उद्घाटक म्हणून उपस्थित होते.


महाविद्यालयातील महिला विकास कक्षाच्यावतीने महाराष्ट्र शासन उच्च शिक्षण विभाग आणि मुंबई विद्यापीठ यांच्या निर्देशाप्रमाणे कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेचा उद्देश हा प्रामुख्याने महिलांना सक्षम करणे, आणि विद्यार्थिनींना विविध प्रकारच्या शिष्यवृत्तीची माहिती देणे हा होता. त्यासाठी महाविद्यालयाच्या परिसरातील विविध क्षेत्रातील तज्ज्ञ यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. रायगड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण विभागातील ॲड.गीता म्हात्रे, पोयनाड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष दराडे, अशासकीय संस्थेचे प्रतिनिधी शैलेश कोंडसकर यांची व्याख्याने आयोजित करण्यात आली होती.


ॲड. गीता म्हात्रे यांनी सकाळ सत्रात "महिला विषयक कायदे" या या विषयावर मार्गदर्शन केले.त्यामध्ये विशाखा मार्गदर्शन कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ आणि महिला सुरक्षितता या संदर्भातील यूजीसीचे नियम याबाबतीत मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींनी समाजामध्ये जीवन जगत असताना आणि आणि त्याचा वापर स्वतःच्या सुरक्षिततेसाठी आवर्जून करावा असे आवाहन ॲड. गीता दर्शन म्हात्रे यांनी केले . 


 दुपार सत्रामध्ये शैलेश कोंडसकर सरांनी विद्यार्थिनींना सखोल मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या शेवटच्या सत्रात पोयनाड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष दराडे यांनी महिला सुरक्षिततेसंबंधीच्या उपायोजना या विषयावर व्याख्यान दिले.


कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना माजी आमदार पंडित पाटील यांनी आपल्या संभाषणातून महिला सुरक्षिततेचा प्रश्न अतिशय गंभीर असून समाजाने सजग असलं पाहिजे. स्वतःच्या संरक्षणासाठी महिलांनी पुरेशी काळजी घेतली पाहिजे. शासकीय उपाययोजना असतातच परंतु या उपायोजनांच्या सोबत आपण स्वतःची सुरक्षितता प्राधान्य मानून सामाजिक जीवन जगले पाहिजे व समाज माध्यमांचा वापर करताना भान ठेवून आपण फसवले जाणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे असेही पंडितशेठ पाटील यांनी स्पष्ट केले होते.


याप्रसंगी बोलताना युवा नेते आणि सामाजिक कार्यकर्ते सवाई पाटील यांनी स्वातंत्र्याचा अतिरेक होणार नाही. याची काळजी मुलींनी स्वसंरक्षण करताना घेतली पाहिजे असे प्रतिपादन केले. त्याचबरोबर आसपासच्या परिसरामध्ये मुली आणि महिलांच्या संदर्भात हिंसाचाराच्या घटना घडून येत.यासाठी शिक्षण आणि समुपदेशनाच्या माध्यमातून विद्यार्थिनी आणि महिलांमध्ये जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे.त्यासाठी प्रत्येकाने महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक संस्थेमध्ये भौतिक सुरक्षिततेच्या उपाययोजना, आपत्कालीन व्यवस्थापन,आरोग्य आणि सुरक्षितता, सुरक्षित उपकरणे आणि कायदेशीर अनुपालन या घटकांची देखील गरज आहे असे सवाई पाटील यांनी सांगितले. 


या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयातील महिला विकास कक्षाच्या प्रमुख प्राध.डॉ.संगीता चित्रकोटी यांनी प्रभारी प्राचार्य डॉ . अनिल बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली केलेले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संगीता चित्रकोटी यांनी केले. अध्यक्षीय भाषणामध्ये बोलताना प्र. प्राचार्य डॉ.अनिल बांगर यांनी अशा प्रकारचे कार्यक्रम पुन्हा पुन्हा घेतले पाहिजेत जेणेकरून महिलांमध्ये आत्मभान निर्माण होईल व महिलांमध्ये सुरक्षिततेचे वातावरण निर्माण होईल असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.दिलीप पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. महेश बि-हाडे यांनी केले

Post a Comment

Previous Post Next Post