२०२४ च्या विधान सभेसाठी माझी तयारी - रुपाली चाकणकर
मुंबई,(प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्याला वारकरी संप्रदायामुळे समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभला आहे. संतांनी आपल्या जनजागृती कार्याच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात आध्यात्मिक लोकशाही स्थापन केली आहे. आषाढी एकादशीला विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी आषाढी व वारीच्या निमित्ताने २ वर्षाच्या मुलापासून ते ९० वर्षाच्या आजीबाई सुद्धा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून देहू, आळंदी, पंढरपूर येथे दाखल होत असतात. पंढरपुरकडे पायी निघणाऱ्या लाखो वारकऱ्यांमध्ये पुरुषांबरोबर महिला वारकऱ्यांची संख्या ही लक्षणीय असते. या वारी मध्ये महिला वारकऱ्यांच्या स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्य महिला आयोगाकडून ‘आरोग्य वारी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितले.
आरोग्य वारी उपक्रमाच्या प्रभावी अमंलबजावणीसाठी आज महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली पुणे, सातारा, सोलापूर जिल्हा प्रशासनासोबत दुरदृश्यप्रणाली द्वारे बैठक घेण्यात आली. यावेळी महिला आयोगाच्या सदस्या गौरी छाब्रिया, सदस्य सचिव श्रद्धा जोशी, उपसचिव दिपा ठाकूर यांच्यासह उपजिल्हाधिकारी पुणे, अतिरिक्त आयुक्त पुणे महानगरपालिका, उपजिल्हाधिकारी सातारा, उपायुक्त सातारा जिल्हा परिषद, मुख्य कार्यकारी अधिकारी सोलापुर, अतिरिक्त आय़ुक्त सोलापुर महानगरपालिका आदी उपस्थित होते. यात तीनही जिल्ह्याच्या प्रशासनाने केलेल्या तयारीचा आढावा यावेळी घेण्यात आला. मागील वर्षां प्रमाणे याही वर्षी सगळ्या सुख सुविधा महिलांसाठी उपलब्ध असाव्यात या महिला अयोग्य आग्रही होत्या. स्त्रिया नऊवारी साड्या घालून डोक्यावर तुळस घेऊन दिंडीत सामील होत एक दुसऱ्याला आदराने माऊली म्हणत २०० कि.मी चा प्रवास २० ते २२ दिवसात पूर्ण करतात. त्यांच्यासाठी प्रशासनाने या वेळी वारी काळात दर दहा ते वीस कि.मी. अंतरावर वारकरी महिलांसाठी शौचालय व न्हाणी घराची व्यवस्था, सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग व सॅनिटरी नॅपकिन बर्निंग मशीन,स्त्रीरोग तज्ज्ञांची सुविधा, महिला सुरक्षितते करीता १०९१ व १०९८ हेल्पलाईन क्रमांक, स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष, पालखी सोहळ्याकरिता निर्भया पथक तैनात करणे, या सगळया सुविधा महिला वारकऱ्यांसाठी उपलब्ध केल्या आहेत तसेच महिलांच्या निवासा दरम्यान सुरक्षेसाठी त्यांचे हक्क आणि अधिकारांचा माहिती पट ही राज्य महिला आयोगाच्या वतीने दाखवण्यात येणार असून याचीही माहिती या बैठकीमध्ये देण्यात आली.
महिला आयोगाच्या अध्यक्षा पुणे येथे ९ जून, १६ जून सातारा आणि २२ जून सोलापूर येथे स्वतः उपस्थित राहून आरोग्य वारीचे उदघाटन करणार आहेत व ते स्वतः वारीत महिला वारकऱ्यां सोबत चालणार आहेत. २०० कि. मी. टप्पा पार करत असताना हरित वारी व स्वच्छ निर्मळ वारीच्या माध्यमातून मागील वर्षी महिलांच्या हस्ते दहा हजार वृक्ष लागवड करण्यात आले होते. या वर्षी पंधरा हजार वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याचे तसेच वारी संवादाचे आयोजन ही करण्यात येणार आहे. वारी संवादाच्या माध्यमातून काही त्रुटी राहिल्या असतील तर त्याच्यावर काम करता येऊ शकेल. तसेच आरोग्य आणि सुरक्षेची वारी सफळ होण्यासाठी सगळे अधिकारी मदत करत आहेत असे ही चाकणकर यांनी सांगितले.
राज्याची राजधानी येथे आंतरराष्ट्रीय प्रतीच्या महिला खेळाडू न्याय मागण्यासाठी उपोषणाला बसले आहेत, आता तर त्यांना जे मेडल्स व पारितोषिक मिळाले ते सुद्धा नदीत वाहून त्याचा त्याग करणार आहेत. या सगळ्याची केंद्र सरकारकडून काहीच दखल घेतली जात नाही, त्यांचे म्हणणे एकूण घेतले जात नाही या वर प्रश्न विचारला असता चाकणकर म्हणाल्या की, खरतर कुठला जिल्याची, राज्याची व देशाची प्रगतीचा आलेख त्या भागातील महिला सुरक्षेच्या वरून ओळखला जातो. बेटी पढाओ - बेटी बचाओ चा नारा देत असताना अगदी हाकेच्या अंतरावर कित्येक महिन्यांपासून महिला खेळाडू उपोषणाला बसले आहेत. खेळाडूंच्या व्यथा जाणून घेणे हे सरकारचे काम आहे. देशासाठी खेळत असणाऱ्या महिला खेळाडूंवर अश्या प्रकारे अमानुषपणे लाडीमार करणे चुकीचे आहे त्यासाठी राज्य महिला आयोगाच्या वतीने राष्ट्रीय महिला आयोगाला पत्र पाठवून जी काही घटना घडली त्याची दखल घेऊन खेळाडूंना न्याय द्यावा अशी मागणी महिला आयोगाकडून करण्यात आली आहे.
पुणे येथे दिंडी दोन दिवस मुक्कामी असणाऱ्या महिलांसाठी १२९० स्वच्छतागृह,१२ शाळांमध्ये न्हाणी घर, पाच हजार सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग व सॅनिटरी नॅपकिन बर्निंग मशीन,१ ते २ कि.मी अंतरावर १८७ आरोग्य पथक उपलब्ध असणार आहे. दिवे घाटातून पुढे जाते तिथे दहा बेडची अंतररुग्ण व्यवस्था. सातारा, खंडाळा येथील २७ अंगणवाड्यात, फलटण मध्ये ३७ अंगणवाड्यात महिला स्वच्छतागृह व न्हाणी घरांची व्यवस्था, १५ ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग व सॅनिटरी नॅपकिन बर्निंग मशीन व २१ ठिकाणी फिरते आरोग्य दूत पिवळया गणवेशात असणार आहे. सातारा पोलीस विभागामार्फत निर्भय पथक सुद्धा सज्ज असणार आहे. तर २२ जुन रोजी सोलापूर जिल्यात ७४ ग्रामपंचायती मध्ये नियोजन त्यात ४३ ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन,४० ठिकाणी हिरकणी कक्ष तर ७० ठिकाणी हेल्पलाईन फलक दर्शनी ठिकाणी लावण्यात आले आहेत.
खडकवासला येथून विधानसभा लढविण्यास इच्छुक
निवडणुकी लडवण्या संदर्भात त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, २०१९ साली पक्षाकडे उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण मुलाखतीच्या दिवशी महिला प्रदेश अध्यक्षचे नियुक्ती पत्र देण्यात आले होते. आपली एक जबाबदारी म्हणून महिला संघटन उभे करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला, कारण पक्षाच्या पडत्या काळात जबाबदारी पार पाडणे हे माझे कर्तव्य होते. परंतु २०२४ मध्ये खडकवासला येथून विधानसभा उमेदवारीसाठी पक्षाकडे मागणी करणार असल्याचे चाकणकर यांनी सांगितले.