केजरीवालांना कोठडीतून आदेश देण्यावर बंदी घालावी

उच्च न्यायालयात याचिका दाखल

नवी दिल्ली : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ईडीच्या कोठडीत असताना त्यांना कोणताही आदेश देण्यापासून रोखण्याची विनंती करणारी जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. याशिवाय टायपिस्ट, कॉम्प्युटर प्रिंटर आदी न देण्याची विनंतीही जनहित याचिकेत करण्यात आली आहे. अरविंद केजरीवाल यांनी पोलीस कोठडीत दिलेले आदेश दिल्लीचे मंत्री आतिशी यांच्यापर्यंत कसे पोहोचले याची तक्रार नोंदवण्याचे, तपास करण्याचे आणि खटला चालवण्याचे निर्देश ईडीला द्यावेत, अशी विनंतीही याचिकाकर्त्याने न्यायालयाला केली आहे.

याचिकाकर्ते सुरजित सिंह यादव यांनी शशी रंजन कुमार सिंग आणि महेश कुमार या वकिलांच्या माध्यमातून पुढे म्हटले आहे की, अरविंद केजरीवाल हे अटकेबाबत निर्देश आणि आदेश जारी करताना भारतीय राज्यघटनेच्या तिसऱ्या अनुसूची अंतर्गत त्यांना दिलेल्या गोपनीयतेच्या शपथेचे उल्लंघन करत आहेत. याच याचिकाकर्त्याने अलीकडेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली सरकारच्या मुख्यमंत्री पदावरून हटवण्याची प्रार्थना करत दिल्ली उच्च न्यायालयात आणखी एक जनहित याचिका दाखल केली आहे.

याचिकेत म्हटले आहे की, अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर दिल्ली सरकारचे मंत्री आतिशी यांनी २१ मार्च २०२४ रोजी अनेक वाहिन्यांना मुलाखत देताना अरविंद केजरीवाल आपल्या पदाचा राजीनामा देणार नाही आणि गरज पडल्यास निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले होते. या याचिकेत म्हटले आहे की केजरीवाल हे मुख्यमंत्री म्हणून कायम राहिल्याने कायदेशीर प्रक्रियेला बाधा येईल ज्यामुळे राज्यातील घटनात्मक यंत्रणा बिघडू शकते.


Post a Comment

Previous Post Next Post