मुंबई: इराणी चषकाचे यजमानपद यंदा मुंबई भूषवणार होती, ही स्पर्धा १ ते ५ ऑक्टोबर दरम्यान खेळवली जाणार होती. परंतु अनिश्चित पावसामुळे ते लखनऊला हलवावे लागले. या चषकात फक्त एकच सामना खेळला जातो, जो गतविजेता रणजी विजेता आणि शेष भारत यांच्यात खेळला जातो. इराणी चषक ही भारतातील देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा आहे जी प्रथम श्रेणी फॉर्मेट अंतर्गत खेळली जाते. ही क्रिकेट स्पर्धा सध्याचा रणजी करंडक विजेता संघ आणि शेष भारत संघ (रणजी ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी करणारे इतर संघातील खेळाडू) यांच्यात दरवर्षी खेळली जाते. उर्वरित भारताने ३० वेळा या स्पर्धेचे जेतेपद पटकाविले आहे. तर मुंबईला १४ वेळा चषक आपल्याकडे ठेवता आला आहे.
या क्रिकेट स्पर्धेची सुरुवात १९५९-६० मध्ये झाली. त्यावेळी रणजी करंडक स्पर्धेला २५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे या स्पर्धेचा पाया रचला गेला. देशांतर्गत क्रिकेट अधिक मनोरंजक आणि रोमांचक बनवणे हा त्यामागील उद्देश होता. या स्पर्धेला बीसीसीआयचे माजी प्रशासक झेडपी इराणी यांचे नाव देण्यात आले, ज्यांनी बीसीसीआयमध्ये दीर्घकाळ अध्यक्ष आणि कोषाध्यक्षांसह अनेक महत्त्वाची पदे भूषवली. १९६२ पासून सातत्याने आयोजित करण्यात येत असलेली ही स्पर्धा उर्वरित भारताने ३० वेळा जिंकली आहे, तर मुंबईने १४ वेळा जिंकली आहे. इतर राज्यांपैकी कर्नाटकने सहा वेळा विजेतेपद पटकाविले आहे, तर दिल्ली, रेल्वे आणि विदर्भ प्रत्येकी २ वेळा विजेते ठरले आहेत. मागील स्पर्धेत शेष भारताने सौराष्ट्राचा १७५ धावांनी पराभव करून ही स्पर्धा जिंकली होती.
इराणी चषक २०२४-२५ आता मुंबईऐवजी लखनऊमध्ये होणार आहे. १ ऑक्टोबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीत शेष भारत आणि गतविजेत्या रणजी विजेत्या मुंबई यांच्यात होणारा हा सामना लखनऊच्या अटलबिहारी वाजपेयी एकना स्टेडियमवर खेळवला जाईल. उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे सचिव अरविंद कुमार श्रीवास्तव म्हणाले, "यावेळी इराणी चषक सामना लखनऊमध्ये होणार आहे आणि आम्ही त्याचे आयोजन करण्यास उत्सुक आहोत."