नवी मुंबई महापालिका प्रशासनाचा निर्णय
मालमत्ताकर हा नवी मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्त्रोत असल्याने व यामधून प्राप्त होणा-या महसूलातूनच विविध नागरी सुविधा कामे केली जात आहेत. मात्र काही प्रमाणात मालमत्ता कर भरण्यावर नागरिकांचा कल कमी असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच जे नागरिक आर्थिक अडचणींमुळे मालमत्ता कर विहीत वेळेत भरू शकले नाहीत, अशा मालमत्ताकर धारकांना त्यांच्या थकबाकीमुळे लागलेल्या दंडात सवलत मिळावी यादृष्टीने ही योजना जाहीर करण्यात आली आहे.
सन २०२२-२३ चे आर्थिक वर्ष ३१मार्च २०२३ रोजी संपुष्टात येत असून तत्पूर्वी मालमत्ता कर थकबाकीदारांना दिलासा मिळावा व महानगरपालिकेचा थकीत मालमत्ता कर वसूल होऊन ही रक्कम नागरिकांच्या सेवासुविधांसाठी उपलब्ध व्हावी यादृष्टीने महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सकारात्मक दृष्टीकोन नजरेसमोर ठेवून नागरिकांना दिलासा देणारी ही अभय योजना लागू केली आहे.