कुटुंबियांचा आरोप...
डोंबिवली / शंकर जाधव : चौकशीसाठी मुलाला पोलीस ठाण्यात नेल्याने समजताच त्याचे वडील पोलीस ठाण्यात गेले. मात्र त्याच्या पोलीस ठाण्यात मृत्यू झाला. संशयास्पद मृत्यू असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला असून याला पोलीस जबाबदार असल्याचे म्हणणे आहे.आम्हाला जोवर न्याय मिळत नाही तोपर्यत मृतदेह ताब्यात घेणार नाही असे सांगितले. मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणी न्याय मिळावा मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दीपक भिंगारदिवे असे मृत व्यक्तीचे नाव आहे.त्यांचा मुलगा प्रशिक याला कोळसेवाडी पोलिसांनी चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणले.आपल्या मुलाला पोलीस ठाण्यात नेल्याचे समजताच दीपक भिंगारदिवे यांनी पोलीस ठाणे गाठले.पोलीस विचारपूस करत असताना भिंगारदिवे यांचा मोबाईलमधून शुटींग करत होते. याचा राग आल्याने भिंगारदिवे आणि पोलीस याच्यात बाचाबाची सुरु झाली.काही वेळाने भिंगारदिवे यांना फीट आल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले.मात्र डॉक्टरांनी भिंगारदिवे हे मृत घोषित केले. भिंगारदिवे यांच्या मृत्युला पोलीस जबाबदार असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.दरम्यान पोलिसांनी कुटुंबीयांनी आरोपाचा इन्कार केला आहे.या प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करणार असल्याचे सांगितले.