दिवा/ आरती मुळीक परब : दिव्यातील जाधव कुटुंबियांनी आपल्या मुलाचा श्लोक वैभव जाधव याचा वाढदिवस अनोख्या पध्दतीने साजरा केला. श्लोकच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत हेदूळ गावातील तीन बालवाडीतील लहान मुलांना जेवणाचे डब्बे दिले. तर स्वतःच्या मुलाच्या वाढदिवसावर व्यर्थ खर्च न करता ठाण्यातील येऊर मधील स्वामी विवेकांनद बालकाश्रमामध्ये अन्नदान करुन, केक कापून, लहान मुलांना शाळेच्या बॅग देऊन वाढदिवस साजरा केला.
अशा अनोख्या पध्दतीने मुलाचा वाढदिवस साजरा करणार्या जाधव कुटुंबियांचे दिवा परिसरात कौतुक केले जात आहे. प्रत्येकाला वाटत असतं आपल्या मुलाचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करावा. परंतु या सर्व गोष्टींना बाजुला करत आपण सुध्दा समाजाचं काही तरी देणं लागतो ही भावना मनात ठेवून त्यांनी आपल्या मुलाचा वाढदिवस वेगळ्या पध्दतीने साजरा केला.
Tags
महाराष्ट्र