डोंबिवली / शंकर जाधव : टिटवाळा येथे बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर तस्करांकडून गायांची तस्करी सुरू असल्याचे कितवा पोलिसांनी उघडकीस आणला. बजरंग दलाच्या मदतीने कितवा पोलिसांनी टिटवाळा परिसरातील राये गावातील निर्जन परिसरातील अनधिकृत व अर्धवट बांधलेल्या अनेक चाळीच्या खोल्यात डांबून ठेवलेल्या ४६ गाईची सुटका केली.या प्रकरणी गायची तस्करी करणाऱ्यांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहापूर,मुरबाड,कल्याण तालुक्यातील अनेक गायींची चोरी करून त्यांची तस्करी होत असल्याने ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी तस्करांविरोधी कठोर कारवाई करण्याचे ठरविले. पोलिसांनी शहापूर, कल्याण, मुरबाड, पडघा अशा विविध ठिकाणी धडक कारवाई केली. या कारवाईत टिटवाळा पोलिसांनी खडवली जवळ असलेल्या राये गावात कारवाई करत कत्तली साठी डांबून ठेवण्यात आलेल्या गाईंची तस्करांकडून सुटका केली. त्यात तब्बल ४६ गाय व बैलांचा समावेश असून हे सर्व गाई बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर खडवलीतील राये गावात निर्जन परिसरातील अनधिकृत व अर्धवट बांधलेल्या अनेक चाळीच्या खोल्यात डांबून ठेवल्या होत्या. 28 तारखेला बकरी ईद च्या दरम्यान या सर्व गाईची कत्तल करू मोठ्या प्रमाणात यायचं मास महाराष्ट्राच्या विविध ठिकाणी नेणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कारवाई मुरबाड उपविभागीय अधिकारी जगदीश शिंदे,मुरबाड तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे,कुळगांव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भोई,कल्याण तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर व टिटवाळा पोलिस स्टेशनचे 25 ते 30 पोलीस कर्मचाऱ्यांनी बजरंग दल च्या मदतीने कारवाई करण्यात आली.