डोंबिवली / शंकर जाधव : महाराष्ट्र नगर मित्र मंडळ, सार्वजनिक नवरात्र उत्सव, डोंबिवली पश्चिम यांच्यावतीने २५ व्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त, डोंबिवली परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने, आवश्यक असणारे आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड जे केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या वतीने, नागरिकांच्या साठी पाच लाख रुपये औषधोपचार व शस्त्रक्रियेसाठी उपयुक्त असणारे कार्ड बनवून देण्याचे शिबीर सुरू झाले आहे.
नागरिकांनी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून पहिल्याच दिवशी २८८ लोकांनी लाभ घेतला. २८ तारखेपर्यत हे शिबीर सुरू राहणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी डोंबिवलीकरांनी या शिबिराचा लाभ घ्यावा अशी विनंती मंडळातर्फे करण्यात आली आहे.व्यवस्थापन महाराष्ट्र नगर मित्र मंडळ अध्यक्ष सुभाष कदम, कार्याध्यक्ष कैलास सणस, सचिव तुषार गावडे, खजिनदार इंगळे तसेच सभासद रामचंद्र सावंत, श्याम सुतार, तावडे, पवार, खैरे, प्रकाश मर्गज, राजू जाधव अनेक कार्यकर्ते आणि महिला सदस्य उपस्थित होते.
कल्याण - डोंबिवली महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागातर्फे, कर्मचाऱ्यांनी चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करून लोकांना कार्ड उपलब्ध करून दिल्याबद्दल मंडळाने आभार मानले.