शिवसेना आजदे शाखेचा व जे पी ग्रुप मित्र मंडळाचा उपक्रम
डोंबिवली/ शंकर जाधव : शाळेची घंटा वाजली पण दप्तरात वह्या नाहीत.. अशी चिंता गरीब विद्यार्थ्यांना आणि पालकांना वाटत असते. या विद्यार्थ्यांना जे पी ग्रुप आणि शिवसेना आजदे शाखेकडून गेली १९ वर्ष मोफत शालेय साहित्याचे वाटप केले जाते. यंदाचे २० वे वर्ष असून यावर्षीही शालेय साहित्य घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती.तसेच आजदे येथील आरोग्य केंद्र पुन्हा सुरु करा अशी मागणी माजी सरपंच जयंता पाटील यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.
यावेळी माजी सरपंच जयंता पाटील म्हणाले, कोणताही राजकीय हेतू समोर न ठेवता गेली १९ वर्ष आजदेपाडा येथे गरीब विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप केले जाते.मी एक महिन्यापूर्वी प्रशासनाला पत्र दिले होते की, आजदे येथील आरोग्य केंद्र पुन्हा सुरु करा. पालिकेत २७ गावे समाविष्ट झाल्यावर आरोग्य केंद्र मांडा –टीटवाला येथे हलविण्यात आले. त्यामुळे येथील नागरिक नाराज झाले असून नागरिकांच्या तक्रारीवरून प्रशासनाला पत्र दिले आहे. प्रशासनानेही यावर गंभीर्याने विचार करून पुन्हा आजदे येथे आरोग्य केंद्र सुरु करावे अशी आमची मागणी आहे.मी सरपंच झाल्यानंतर आजदे येथे विकास कामांचा धडका लावला होता. त्याच कामाच्या आधारे ग्रामपंचायतीचा आजही सदस्य असताना ज्या योजना जे कार्य केले तीच कामे सुरु आहेत.
शिवसेना आजदे शाखा आणि जे पी ग्रुप मित्र मंडळ यांच्या वतीने गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करताना माजी सरपंच जयंता पाटील, बंडू पाटील, गुरुनाथ लोते,विठ्ठल जाधव, रवी दत्तू जाधव, प्रवीण जोशी, काजल जयंता पाटील, चिन्मय जयंता पाटील, साहिल जयंता पाटील, निर्मल प्रसाद कवठकर, शीतल जयंता पाटील,मनीषा निंबले, गीता पावसकर, विश्वजित घघोरपडे, महेश महाले, अमित कोरगावकर, बाळकृष्ण देसाई, दत्ता पाटील, विजय आंग्रे, शिवम निकम , शांताराम कोरगावकर, तुकाराम कोरगावकर, समीर तळवडेकर, अजित साळवी, ध्रुव बैरागी, तेजस निबांळे, सुदर्शन गांगण आदि उपस्थित होते.