मुख्यमंत्री शिंदेंचे मानले आभार
डोंबिवली ( शंकर जाधव ) : स्व. राजेंद्र देवळेकर यांनी महापौर असताना दूरदृष्टी दाखववत कल्याणमधील पालिकेच्या मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्वतंत्र धरणाची गरज असल्याचे सांगितले होते. यानंतर आता वाढत्या लोकसंख्येकरता स्वतंत्र धरणासाठी एस.सी.एच.आयकडून मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली होती. या मागणीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी सकारात्मक विचार करून होणार दिला आहे. लवकरच कल्याण –डोंबिवलीकरांसाठी स्वतंत्र धरण होईल अशी माहिती शिवसेना ( शिंदे गट ) कल्याण पश्चिम शहरप्रमुख रवी पाटील यांनी दिली.
कल्याण –डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे. लोकसंख्येच्या तुलनेने येथील पाणी समस्या सुटली नाही.१ जून २०१५ रोजी पालिकेत २७ गावे समाविष्ट झाली असून येथील पाणी टंचाई जाणवते. नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अमृत योजनेअंतर्गत मोहिली येथील २७५ द.ल.लि. क्षमतेच्या उदंचन केंद्राचा ऑनलाईन भूमिपूजन समारोह संपन्न झाला होता.
केंद्र शासन पुरस्कृत अमृत २.० अभियानाअंतर्गत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील पाणीपुरवठा प्रकल्पाची, मोहिली येथे २७५ द.ल.लि. क्षमतेचे उदंचन केंद्र बांधणे (रु.७७.५८ कोटी), कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात नविन १० जलकुंभ बांधणे ( ४८.४५ कोटी ), कल्याण - डोंबिवली महापालिका क्षेत्रातील नव्याने विकसीत भागात वितरणव्यवस्था टाकणे (२४.४७ कोटी), गौरीपाडा येथे ९५ द.ल.लि. क्षमतेचे जलशुध्दीकरण केंद्र बांधणे (रु.१५२.६२ कोटी) ही कामे मंजूर आहेत. या ३०३.१२ रुपये कोटीच्या मंजूर कामांमुळे महानगरपालिका क्षेत्रातील सद्यस्थितीतील सुमारे २२ लक्ष लोकसंख्येला तसेच झपाटयाने विकसीत होत असलेल्या भागाला सुरळीत व शुध्द पाणी पुरवठा होणार आहे. मोहने उदंचन केंद्र हे सुमारे ४० ते ४५ वर्षे जुने असून या नविन उदंचन केंद्रामुळे, मोहने उदंचन केंद्राच्या देखभाल दुरुस्ती व जलशुध्दीकरण केंद्रातील शुध्दीकरणावर होत असलेल्या खर्चात वार्षिक रुपये ०.७५ ते १.०० कोटी इतकी बचत होणार आहे.
एकीकडे एमआयडीसीची थककेली कोटीच्या वरील रक्कम तर दुसरीकडे टॅकरमाफियाची चांदी यात २७ गावाची जनता त्रस्त झाली. याबाबत शिवसेना ( शिंदे गट ) कल्याण पश्चिम शहरप्रमुख रवी पाटील म्हणाले,कल्याण –डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील नागरिकांसाठी स्वतंत्र धरणाची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.मुख्यमंत्री शिंदे यांनी याकरता होणार दिला असून लवकरच आपली मागणी पूर्ण होईल आणि कल्याण – डोंबिवलीकरांची पाण्यासाठी वणवण थांबणार आहे.