पाणी समस्याप्रकरणी नागरिकांचा पालिका अधिकाऱ्यांना घेराव



रस्ता रोकोचा प्रयत्न; ज्येष्ठ महिलेला आली चक्कर 


डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवली पूर्वेकडील शेलार नाका येथे अनेक दिवसांपासून पाणी येत नसल्याने संतप्त नागरिकांनी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकारी पाखळे यांना घेराव घातला. आम्ही पावसाचे पाणी पिऊन जिवंत रहायचे का असा प्रश्न विचारला. 




या वेळी एका ज्येष्ठ महिलेला चक्कर आल्याने त्यांना जवळील दवाखान्यात नेण्यात आले.यावेळी भाजप कल्याण लोकसभा निवडणूक प्रमुख शशिकांत कांबळे आणि डोंबिवली शहर पूर्व मंडळ उपाध्यक्ष राजू शेख यांनी पालिका पाणीपुरवठा डोंबिवली विभाग अधिकारी चंद्रकांत पाखळे यांना जाब विचारीत जोवर येथील नागरिकांना पाणी मिळत नाही तोवर आपल्याला येथून जाऊ देणार नाही असा इशारा दिला. 



तसेच पालिका मुख्यालयात हजारो नागरिकांना घेऊन ठिय्या आंदोलन करू असे सांगितले. तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पालिका आयुकतांशी बोलले असून येथील पाणी समस्या दूर करू असा असे आयुक्तांनी आश्वासन दिले आहे.




Post a Comment

Previous Post Next Post