कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरातील पाणीपुरवठा २४ तासांसाठी बंद

 

गुरुवार दुपारपासून ते शुक्रवार दुपारपर्यंत २४ तासांसाठी बंद राहणार

ठाणे : ठाणे महापालिकेच्या जलपुरवठा विभागामार्फत करण्यात येणाऱ्या दुरुस्ती आणि देखभाल कामांमुळे कळवा, मुंब्रा आणि दिवा या परिसरातील पाणी पुरवठा गुरुवार, २३ मे रोजी दुपारी १२ वाजल्यापासून शुक्रवार, २४ मे रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत तब्बल २४ तास पूर्णतः बंद राहणार आहे. या कालावधीत संपूर्ण कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरात पाण्याचा पुरवठा होणार नाही. त्यामुळे नागरिकांनी या काळात पाण्याचा योग्य साठा करून ठेवावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे. तसेच, पाणीपुरवठा सुरळीत झाल्यानंतर प्रारंभी काही काळ पाणी मळकट येण्याची शक्यता असल्याने पाणी फिल्टर करून किंवा उकळूनच वापरण्याची सूचना देण्यात आली आहे. या पाणी कपात काळात नागरिकांनी Mahapalika जलविभागाशी किंवा स्थानिक प्रभाग कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post