दातिवली तलावाचा संरक्षक कट्टा कोसळला

 


 निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करा,

    दिवा भाजपची मागणी

दिवा ( शंकर जाधव )  दातिवली तलावाच्या सुशोभीकरणाच्या कामात निकृष्ट दर्जाचे काम झाले असून या ठिकाणी गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप करत दिवा भाजपचे मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी या कामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

दातिवली तलावाच्या सुशोभीकरणावर मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला. मात्र पहिल्याच पावसात या तलावाच्या सुशोभीकरणासाठी बांधण्यात आलेला संरक्षक कट्टा कोसळला असून हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप रोहिदास मुंडे यांनी केला आहे. या कामाची चौकशी करून ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजपचे रोहिदास मुंडे व महिला अध्यक्षा ज्योती पाटील यांनी केली आहे.



Post a Comment

Previous Post Next Post