शुक्रवारी नवी मुंबईत पाणी नाही

 

पाणी जपून वापरण्याचे पालिकेचे आवाहन

 नवी मुंबई :  नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे धरण ते दिघा मुख्य जलवाहिनीवर देखभाल दुरुस्तीची व इतर कामे करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने शुक्रवार दिनांक २९ डिसेंबर रोजी सकाळी १०.०० ते रात्री १०.०० वाजेपर्यंत भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र येथील पाणी पुरवठा १२ तास बंद ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे शुक्रवार संध्याकाळी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील तसेच कामोठे, खारघर  नोडमधील पाणीपुरवठा बंद राहील त्याचप्रमाणे शनिवार दिनांक ३० डिसेंबर रोजी कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, याची कृपया नोंद घेण्यात यावी.

          त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील व कामोठे, खारघर  नोड मधील नागरिकांना याव्दारे जाहीर आवाहन करण्यात येते की, या कालावधीत पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करुन नवी मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post