डाळी आणि तांदुळाला बऱ्याचदा ओलसर हात लागतात. त्यामुळे मग ओलसरपणामुळे त्यांच्यात किडे- अळ्या होण्याची शक्यता अधिक असते. असे अस्वच्छ झालेले डाळ- तांदूळ मग खावेसेही वाटत नाहीत. म्हणूनच सगळ्यात आधी तर या धान्याला ओला हात लागणार नाही याची काळजी घ्यावे.
- धान्यामध्ये किडे होत असतील तर त्यामध्ये तेजपान टाकून ठेवा. त्याच्या वासाने धान्यात किडे होत नाहीत. - डाळ, तांदूळ, डाळी किंवा पिठांसाठीही हा उपाय करू शकता.
- काडेपेटीच्या काड्या धान्यात टाकल्यानेही किडे होत नाही. कारण त्याला असलेला सल्फरचा वास किड्यांना दूर ठेवतो. पण डाळ, तांदूळ यांच्यासारखे धुता येण्यासारखे जे धान्य आहे, त्यासाठीच हा उपाय करावा.
- डाळ- तांदुळाला थोडी हळद लावून ठेवल्यानेही धान्यांमध्ये किडे- अळ्या होत नाहीत.
- धान्यामध्ये कडुलिंबाची पाने टाकून ठेवा. यामुळेही किडे होत नाहीत.
- वाळलेल्या लाल मिरच्या धान्यात ठेवल्यानेही धान्य वर्षांनुवर्षे स्वच्छ राहते.
- ऊन हा कीटक मारण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. किडींचा प्रादुर्भाव झालेला तांदूळ किंवा डाळ काही वेळ उन्हात ठेवा. त्यामुळे किडे बाहेर येऊन ओलसर जागेकडे धावू लागतील व भात स्वच्छ होईल.
Tags
आरोग्य
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
