आदित्य ठाकरे यांची निवडणुकीत माझ्यासमोर उभे राहण्याची हिम्मत नाही

 


डॉ. श्रीकांत शिंदे यांचा टोला

 डोंबिवली ( शंकर जाधव ) : मोठी मोठी वल्गना करणारे, या मतदार संघात लढू असे म्हणणारे चेहरे ते गेले कुठे ? आदित्य ठाकरे, वरूण सरदेसाई हे या मतदारसंघात का उभे राहिले नाही ? स्थानिक कार्यकर्त्यांना लढायला उभे केले. याचे असे आहे की, `तूम लढो हम कपडे सांभाळते हे`अशी भूमिका त्यांची आहे. येथील विकास कामे पाहून त्यांची या मतदारसंघात उभे राहण्याची हिम्मत झाली नाही, येथील असे विकासाचे धोरण अनेक वर्षापासून आहे असा टोला विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लगावला.

  कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी आदित्य ठाकरे, वरूण सरदेसाई, सुषमा अंधारे, केदार दिघे, सुभाष देसाई यांची नावे उमेदवार म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विचारात घेतली जातील अशी चर्चा होती.

 ३ तारखेला शिवसेना ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर यांना उमेदवारी जाहीर झाली. याबाबत शिवसेनेचे विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, मोठी मोठी वल्गना करणारे, या मतदारसंघात लढू असे म्हणणारे चेहरे होते ते गेले कुठे ? आदित्य ठाकरे, वरूण सरदेसाई हे या मतदारसंघात का उभे राहिले नाहीत ? स्थानिक कार्यकर्त्यांना लढायला उभे केले. `तूम लढो हम कपडे सांभाळते है`अशी भूमिका त्यांची आहे. येथील विकासकामे पाहून त्यांची या मतदारसंघात उभे राहण्याची हिम्मत झाली नाही. विकाससाचे धोरण अनेक वर्षापासून आहे.

 पुढे डॉ. शिंदे म्हणाले, कल्याण लोकसभा मतदारसंघातील झालेली विकास कामे पाहून जनता मला मोठया मताधिक्यांनी निवडून आणतील. येथील जनता विकासाच्या बाजूने, महायुतीच्या बाजूने, महायुतीच्या उमेदवाराच्या बाजूने आहे असा ठाम विश्वास कार्यकर्त्यांना आहे. देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवायचे आहे. देशाचा विकासाचा आलेख आणखी पुढे न्यायचा आहे.



Post a Comment

Previous Post Next Post