Bangladesh prime Minister resigns: बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचा पंतप्रधानपदाचा राजीनामा



  ढाका :  बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून देशभरात सुरू असलेला वाद आता चांगलाच तापला असून त्यामुळे बांगलादेशमध्ये निदर्शने आणि दंगली मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. या दंगलींमध्ये ३०० लोकांचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत शेख हसीना यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव आणला जात होता आणि त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.




 १९७१ मध्ये बांगलादेशच्या स्वातंत्र्ययुद्धात लढलेल्या दिग्गजांच्या नातेवाईकांसाठी ३० टक्के सरकारी नोकऱ्या राखून ठेवलेल्या वादग्रस्त कोटा प्रणालीबद्दल त्यांच्या सरकारविरोधात मोठ्या प्रमाणात विरोध झाल्यानंतर हसिना यांनी पंतप्रधानपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे.  महसीना आणि तिची धाकटी बहीण शेख रेहाना हेलिकॉप्टरमधून देशाबाहेर गेल्याचे स्थानिक प्रसार माध्यमांनी म्हटले आहे. 




 शेख हसीना हेलिकॉप्टरने त्रिपुरातील आगरतळा येथे रवाना झाल्याचे म्हटले जात आहा मात्र, परराष्ट्र मंत्रालय किंवा आगरतळा येथील स्थानिक अधिकाऱ्यांनी याची पुष्टी करण्यास नकार दिला आहे. त्रिपुराचे गृहसचिव पी.के. अशी कोणतीही माहिती आमच्याकडे नाही, असे चक्रवर्ती म्हणाले. मिळालेल्या माहितीनुसार शेख हसीना आणि तिची धाकटी बहीण शेख रेहाना हेलिकॉप्टरने देशाबाहेर पडल्या. काही तासांनंतर शेकडो आंदोलकांनी पंतप्रधानांच्या शासकीय निवासस्थानावर धडक दिली. बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबूर रहमान यांची कन्या शेख हसीना २००९ पासून बांगलादेशवर राज्य करत होत्या. त्या सलग चौथ्यांदा आणि एकूण पाचव्यांदा पंतप्रधान म्हणून निवडून आल्या.



 शेकडो आंदोलकांनी पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानावर धडक दिली. यावेळी निदर्शकांनी सामान्य जनतेला 'लाँग मार्च टू ढाका' मध्ये सामील होण्याचे आवाहन केले होते.  खबरदारी म्हणून सरकारने यापूर्वी संपूर्ण इंटरनेट बंद करण्याचे आदेश दिले होते.  ढाका येथे आंदोलकांनी बांगलादेशचे संस्थापक आणि शेख हसीनाचे वडील शेख मुजीब-उर-रहमान यांच्या पुतळ्याची तोडफोड केली.  बांगलादेशचे लष्करप्रमुख वकार-उझ-झमान यांनी सांगितले की, या हिंसाचारामुळे देशाचे नुकसान झाले आहे. मात्र, लष्कर देशातील परिस्थिती पूर्णपणे हाताळण्यात सक्षम आहे. लष्करानेही राजकीय पक्षांना अंतरिम सरकार स्थापन करून देशात शांतता प्रस्थापित करण्याबाबतचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर आंदोलकांनी कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन करत कोणत्याही परिस्थितीत सेनेने आणि पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार वापर न करण्याच्या सूचना केल्या आहेत. 






देशातील परिस्थिती अस्थिर आणि अनिश्चित असल्याने बांगलादेशच्या लष्करप्रमुखांनी सोमवारी देशाला संबोधित केले. तत्पूर्वी, बांगलादेश सरकारने यापूर्वी इंटरनेट पूर्णपणे बंद करण्याचे आदेश दिले होते कारण निदर्शकांनी सामान्य जनतेला ढाकापर्यंतच्या मोर्चात सामील होण्यास सांगितले होते. तथापि, एका सरकारी एजन्सीने सोमवारी दुपारी ब्रॉडबँड इंटरनेट पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले होते.  बीएसएफचे महासंचालक (कार्यवाहक) दलजित सिंग चौधरी आणि वरिष्ठ अधिकारी भारत-बांगलादेश सीमा सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी कोलकाता येथे पोहोचले आहेत. माहितीनुसार, बीएसएफने शेजारील देशात हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर भारत-बांगलादेश सीमेच्या ४,०९६ किमी परिसरात सर्व युनिट्सना 'हाय अलर्ट' जारी केला आहे.

  


 

Post a Comment

Previous Post Next Post