Siddhivinayak prasad packets: सिद्धिविनायक मंदिराच्या महाप्रसादात उंदीर ?




सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत होणार चौकशी


मुंबई: आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरातील लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी आढळून आली आहे. या घटनेनंतर आता मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरातील लाडूच्या प्रसादावर उंदरांच्या साम्राज्याचा एक कथित व्हिडीओ समोर आला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात थळबळ उडाली आहे. याा प्रकरणावर श्री सिद्धिविनायक गणपती टेंपल ट्रस्टने (एसएसजीटी) मात्र हा आरोप फेटाळून लावला आहे आणि या प्रकरणाची चौकशी सुरू केल्याचे सांगितले आहे.


सिद्धिविनायक मंदिरातील महाप्रसाद लाडूंवर उंदराची पिल्ले आढळून आल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर मंदिर ट्रस्टही ॲक्शन मोडमध्ये आला आहे. मात्र, ट्रस्टने ही घटना षडयंत्र असल्याचे म्हटले आहे. मंगळवार बोलताना शिवसेना नेते आणि एसएसजीटीचे अध्यक्ष सदा सरवणकर याांनी साांगितले की, रोज लाखो लाडू वाटले जातात आणि ज्या ठिकाणी ते तयार होतात ती जागा स्वच्छ आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक अस्वच्छ जागा दाखवण्यात आली आहे आणि ती जागा मंदिराची नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याचबरोबर कथित व्हिडीओमध्ये निळ्या ट्रेमध्ये ठेवलेल्या लाडूंच्या फाटलेल्या पॅकेटवर उंदीर दाखवण्यात आले आहे. याप्रकरणी सीसीटीव्हीचे फुटेज तपासण्यात येतील तसेच याच्या चौकशीसाठी  डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल. जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असे देखील ते म्हणाले.




 तत्पूर्वी एका पत्रकार परिषदेत बोलताना सरवणकर म्हणाले की, प्रसाद स्वच्छ ठिकाणी तयार व्हावा यासाठी मंदिर सर्वतोपरी प्रयत्न करत असते. "तूप, काजू आणि इतर घटक प्रथम बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवले जातात, त्यांच्या मंजुरीनंतर त्या घटकांचा वापर केला जातो, याचबरोबर  प्रयोगशाळेत पाण्याची देखील चाचणी केली जाते. भक्तांना देण्यात येणारा प्रसाद हा शुद्ध असल्याची खात्री झाल्यावरच तो दिला जातो असे त्यांनी सांगितले. 

रिपोर्ट्सनुसार, सिद्धिविनायक मंदिरात दररोज सुमारे ५० हजार लाडू बनवले जातात. प्रसादाच्या एका पॅकेटमध्ये प्रत्येकी ५० ग्रॅमचे दोन लाडू असतात.



Post a Comment

Previous Post Next Post