राजस्थान उच्च न्यायालयाकडून दोघांना दिलासा
जोधपूर : राजस्थान उच्च न्यायालयाच्या जोधपूर खंडपीठाने गुरुवारी सलमान खान आणि शिल्पा शेट्टी यांच्याविरुद्ध चुरू येथील कोतवाली पोलीस ठाण्यात एससी-एसटी कायद्यांतर्गत दाखल केलेला एफआयआर रद्द केला. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरुण मोगा यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. न्यायमूर्ती मोंगा यांनी निकालात म्हटले की, कलम आणि चौकशीशिवाय एससी-एसटी कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवता येणार नाही. 'भंगी' या शब्दाची कोणतीही जात नाही अथवा त्याचा कोणत्याही जातीशी संबंध येत नाही. उलट, एखाद्याचा अपमान किंवा कमीपणा दाखवण्यासाठी नाही तर स्वतःला संबोधित करताना म्हटले गेले होते.
२२ डिसेंबर २०१७ रोजी वाल्मिकी समाजाचे अशोक पनवार यांनी सलमान खान आणि शिल्पा शेट्टी यांच्याविरोधात चुरू येथील कोतवाली पोलीस ठाण्यात एससी-एसटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. २०१३ मध्ये एका टीव्ही मुलाखतीदरम्यान शिल्पा शेट्टी आणि सलमान खान यांनी 'भंगी' हा शब्द वापरला होता, असे तो म्हणाला होता. यामुळे वाल्मिकी समाजातील लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या.
गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास अधिकाऱ्यांनी १८ जानेवारी २०१८ रोजी नोटीस बजावली. शिल्पा शेट्टीने सोशल मीडियावर आपल्या कमेंटचा विरोध केल्यानंतर माफीही मागितली होती. सुनावणीदरम्यान सलमान आणि शिल्पाचे वकील गोपाल सांडू यांनी युक्तिवाद केला की या एफआयआरमध्ये सामाजिक भावना दुखावल्याचा कोणताही पुरावा नाही. त्यांनी दरबारात भांगी या शब्दाच्या उत्पत्तीविषयी माहिती दिली आणि सांगितले की, भंगी हा शब्द संस्कृतमधील भांगापासून आला आहे, जो अस्पृश्य जातीशी संबंधित नसून त्याचा अर्थ तुटलेला आणि खंडित असाही आहे. ऑक्सफर्ड हिंदी ते इंग्लिश डिक्शनरीनुसार, जे लोक गांजाचे सेवन करतात त्यांना भंगी देखील म्हणतात. पक्षकार आणि विरोधकांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरुण कुमार मोंगा यांनी चुरू येथील कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल केलेला एफआयआर फेटाळला.
.jpeg)