दिव्यात अडकलेल्या १३ रहिवाशांची अग्निशमन दलाकडून सुटका



दिवा / आरती परब : दिवसभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे ठाणे शहरासह दिवा परिसरातील सखल भाग पाण्याखाली गेले. संतोष नगर परिसरातील नाईक नगर चाळीमध्ये पाणी शिरल्याने तेथील १३ रहिवासी घरातच अडकले होते.


घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिकेच्या शीळ अग्निशमन केंद्रातील जवानांनी मंगळवारी रात्री तातडीने धाव घेतली आणि अडकलेल्या सर्व रहिवाशांची सुखरूप सुटका केली.


सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. वाचविण्यात आलेल्या रहिवाशांना तात्पुरत्या स्वरूपात त्यांच्या नातेवाईकांकडे राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या संदर्भात ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी यांनी माहिती दिली.

Post a Comment

Previous Post Next Post