ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या वागळे प्रभाग समिती व लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती अंतर्गत असलेल्या इंदिरानगर संप येथे अमृत २.० पॅकेज २ अंतर्गत नव्या संप व जलकुंभाच्या बांधकामाचे काम सुरू आहे. या कामादरम्यान जुन्या संपमधील पंपाचे पॅनल स्थलांतर करणे आवश्यक असल्याने, मंगळवार, ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.०० पासून ते बुधवार, ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.०० वाजेपर्यंत (२४ तास) पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
या काळात इंदिरानगर, श्रीनगर, वारलीपाडा, कैलासनगर, रूपादेवी, रामनगर, येऊर एअर फोर्स आणि लोकमान्य जलकुंभ परिसरातील भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील.
महानगरपालिकेच्या माहितीनुसार, शटडाऊन पूर्ण झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, त्यामुळे नागरिकांनी आगाऊ पाण्याची साठवण करावी व पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पालिका प्रशासनाने या कालावधीत सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
Tags : #TMCUpdate #WaterSupply #ThaneCity #MaharashtraWebNews