दिवा/ आरती मुळीक परब: दिवेकरांसाठी दिवा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्पेशल लोकलसाठी आणि स्थानकाच्या समस्यांसाठी समाजसेवक अश्विनी केंद्रे व अमोल केंद्रे यांनी आज एल्गार मोर्चा काढला.
दिव्यात 2015 ला नागरिकांनी रेल रोको करुन जलद गाडीला थांबा आणि दिवा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल सुरु करण्याची मागणी केली होती. आज दिव्यातील समाजसेवक अश्विनी केंद्रे व अमोल केंद्रे यासाठी आक्रमक होऊन एल्गार मोर्चा काढण्यात आला. तसेच दिवा रेल्वे स्थानकातील अनेक समस्यां संदर्भात दिवा रेल्वे स्टेशनचे उपस्टेशन मास्तर कमलेश कनोजिया यांना निवेदन देण्यात आले. दिव्यातील दातीवली रोड, विठ्ठल मंदिर ते दिवा पूर्व रेल्वे स्टेशन फाटक पर्यंत मोर्चा काढण्यात आला. दिवा रेल्वे स्थानकाचे उपस्टेशन मास्तर कमलेश कनौजिया यांनी दिवा येथून लवकरच लोकल सोडण्यात येणार आहे. याबाबत रेल्वे प्रशासन प्रयत्नशील आहे. सर्व जलद लोकल थांबण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. दिवा पूर्व रेल्वे तिकीट घर लवकरच चालू करण्यात येईल. तसेच आरक्षण खिडकीसह इतरही मागण्या रेल्वे प्रशासन अधिकारी लवकरात लवकर सोडवतील. असे त्यावेळी सांगितले. तसेच 2 महिन्यात दखल घेवून समस्या न सोडविल्यास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मध्य रेल्वे प्रबंधक कार्यालय समोर आंदोलन करण्यात येईल आणि वेळ पडली तर रेल रोको आंदोलन करण्यात येईल, असे समाजसेवक अमोल धनराज केंद्रे सांगितले आहे. या मोर्च्यात प्रसंगी रामपाल मौर्या यांच्यासह दिव्यातील अनेक दिवेकर महिला व रहिवाशी उपस्थित होते.