प्रवाशांचे मोबाईल चोरणारा अटकेत

आठ महागडे मोबाईल गेले हस्तगत

डोंबिवली ( शंकर जाधव ) :  लोकलमधील प्रवाशांचे मोबाईल खेचून पळून जाणाऱ्या चोरट्याला कल्याण रेल्वे गुन्हे अन्वेशन विभागाने बेड्या ठोकून गजाजाड केले.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सलमान अन्सारी असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव असुन तो भिवंडीत राहतो.काही दिवसापासून मध्य रेल्वेच्या काही रेल्वे स्थानकात चोरीच्या घटना वाढल्या होत्या.  प्रवासी लोकल गाडी पकडण्याच्या तयारीत असताना हा चोरटा   त्यांचे मोबाईल खेचून पळून जायचा.१९ जानेवारी  रोजी कल्याण रेल्वे स्थानकात मोबाईल चोरीची घटना घडली होती. या प्रकरणात कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर रेल्वे पोलिसांसह कल्याण रेल्वे क्राईम ब्रांच पथकानेही या प्रकरणाचा तपास सुरू केला.पोलिस तपासात सलमान हा चोरीच्या प्रकरणात आधारवाडी कारागृहात असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी सलमानचा  ताबा घेऊन पोलीस कस्टडीत चौकशी केली. सलमानने या आधी कल्याण रेल्वे स्थानकात  प्रवाशांचे मोबाईल चोरल्याची कबूली पोलिसांकडे दिली. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

   पोलीस आयुक्त रविंद्र शिसवे, उपायुक्त मनोज पाटील, कल्याण रेल्वे क्राईम ब्रांचचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अरशद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला होता. पोलिसांनी रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फूटेज तपासले असता त्यात एक चोरटा दिसून आला होता.

    या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरिक्षक अर्शद शेख यांच्यासह पोलीस उप निरिक्षक प्रकाश चौगूले, पोलीस कर्मचारी राजेंद्र दीवटे, जर्नादन पुलेकर, अजय रौंधळ, रविंद्र दरेकर, वैभव जाधव, स्मिता बसावे, पद्मा केंजळे, महेंद्र कर्डीले, रविंद्र ठाकूर, हितेश नाईक, अजित माने, सोनाली पाटील, गाेरख सुरवसे, अक्षय चव्हाण आणि सुनिल मागाडे यांनी  केला.



Post a Comment

Previous Post Next Post