ECI : निवडणूक आयोग ॲक्शन मोडवर

  •  ६ राज्यांतील गृहसचिवांची हकालपट्टी 
  • पश्चिम बंगालच्या पोलीस आयुक्तांना हटविण्याचे आदेश
  • बृहन्मुंबई महापालिकेचे आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्तांचा देखील समावेश 

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडच्या मुख्यमंत्री कार्यालयातील गृह सचिवांना हटवण्याचे आदेश दिले आहेत.  यासोबतच पश्चिम बंगालच्या पोलीस प्रमुखांना हटवण्याचे देखील आदेश देण्यात आले आहेत.  निवडणूक आयोगाने (ECI) बृहन्मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल आणि अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्तांनाही हटवले आहे.  निवडणूक आयोगाने सचिव जीएडी मिझोराम आणि हिमाचल प्रदेश यांनाही काढून टाकले आहे, जे संबंधित सीएम कार्यालयात पदभार सांभाळत होते.

विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका विरोधी पक्षनेत्याने निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर याबाबत तक्रार केली होती. तक्रार प्राप्त झाल्यानंतर निवडणूक आयोगाने देशातील निवडणुका निष्पक्ष पार पडाव्यात यासाठी आयोगाने सर्व राज्य सरकारांना निवडणूक संबंधित कामाशी ज्यांचा संबंध येतो अशा तसेच ज्यांनी आपला तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे किंवा ते त्यांच्या गृहजिल्ह्यांमध्ये आहेत अशा अधिकाऱ्यांची बदली करण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या ६ राज्यांतील गृहसचिवांचा समावेश आहे. यासोबतच मिझोराम आणि हिमाचल प्रदेशमधील सामान्य प्रशासकीय विभागातील सचिव आणि पश्चिम बंगालचे पोलीस महासंचालकांना पदावरून हटवण्याचे आदेश दिले. मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाने इक्बाल सिंग चहल यांच्यासह मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्तांनाही हटवले आहे.

आयुक्तांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असतो, चहल यांचा कार्यकाळ तीन वर्षांपेक्षा जास्त झाला होता. मात्र, अपवाद म्हणून त्यांची बदली करण्यात येऊ नये म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले होते. परंतु, निवडणूक आयोगाने त्यांची विनंती मान्य केली नाही. आयोगाने BMC आणि अतिरिक्त/उपायुक्तांना सोमवारी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत अहवाल देण्याच्या सूचनांसह बदली करण्याचे निर्देश दिले आहेत. 

 

Post a Comment

Previous Post Next Post