- १२ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जखमी
- राज्य सरकारकडून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख
- पंतप्रधानांकडून प्रत्येकी २ लाख, जखमींना ५० हजार रुपये
मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला. सुमारे ४० किमीपर्यंत स्फोटांचा आवाज ऐकू येत होता. स्फोटानंतर कारखाना उद्ध्वस्त झाला. आगीमुळे आजूबाजूच्या घरांमध्ये तीव्र उकाडा जाणवत होता. अनेक घरेही आगीच्या प्रभावाखाली आली. सुमारे तासभर कारखान्यातून स्फोटांचे आवाज येत होते. ही घटना घडली त्यावेळी कारखान्यात सुमारे ५०० लोक काम करत होते. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. बचावकार्यासाठी लष्कराची मदत घेण्यात येत आहे. आगीच्या झळा आणि स्फोटाचा आवाज एवढा मोठा होता की कोर्टात सुनावणी करणाऱ्या मॅजिस्ट्रेटलाही कोर्टातून बाहेर काढण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेमुळे लोक भयभीत झाले असून मोठा बाजार ते नारायण टॉकीज चौकापर्यंतचा संपूर्ण बाजार बंद करण्यात आला. अनेक घरे रिकामी करण्यात आली आहेत. प्रशासनाकडून याठिकाणी अनेकवेळा तपास करूनही कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नसल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले होते.